
नंदूरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि मोलगी परिसरात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कैरी आणि आंबा पिकाचं नुकसान झालं आहे.

सातपुड्याच्या परिसरामध्ये कैरी पासून मोठ्या प्रमाणात आमचूर बनवण्याचा उद्योग आदिवासी शेतकरी करत असतात

मात्र वारंवार होणाऱ्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालला आहे.

ऐन तोडणीला आलेल्या कैऱ्या मान्सूनपूर्वी आलेल्या पावसामुळे गळून पडल्या आहेत. कैरी पासून आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प झालं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे आता शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी आता आदिवासी शेतकरी करत आहे.