वारंवार चक्कर येतंय ?, शरीरात या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?
अनेकांना वारंवार चक्कर आल्यासारखे वाटत असते. काही लोक याला थकवा, कमजोरी वा बदललेला मोसम यामुळे होत असेल असे समजून दुर्लक्ष करतात. परंतू या मागे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता एक कारण असू शकते.

व्हिटामिन्स शरीरातील अनेक गरजेच्या कामासाठी आवश्यक असतात आणि यांच्या कमतरतेने आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. मात्र, वारंवार चक्कर येणे हे केवळ व्हिटामिन्सच्या कमतरतेचे लक्षण नसते. त्यास इतरही कारणे जबाबदार असतात.

यामागे लो ब्लड प्रेशर, एनिमिया, डिहायड्रेश, कानाशी संबंधित आजार किंवा अन्य कारेण देखील असू शकता. मात्र,काही बाबतीत व्हिटामिन्सची कमतरता देखील यास कारणीभूत ठरु शकते. सतत चक्कर येत असेल तर यास हलक्यात घेऊ नये. याचे योग्य कारणांचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करणे हे फायद्याचे ठरेल.

व्हिटामिन्सच्या कमतरतेने चक्कर येत असेल ? वारंवार चक्कर येण्याच्या मागे व्हिटामिन्स बी-12, व्हिटामिन्स डी आणि फोलेट म्हणजे व्हिटामिन्स बी-9 ची कमतरता असू शकते. व्हिटामिन्स बी-12 आणि फोलेट रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत महत्वाची भूमिका निभावतात. यांच्या कमतरतेने एनिमिया होऊ शकतो. ज्यामुळे शरीर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पोहचवत नाही. आणि चक्कर, कमजोरी आणि थकवा जाणवू शकतो.

वारंवार चक्कर का येते ? तसेच व्हिटामिन्स डीची कमतरता स्नायूंची कमजोरी आणि संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. ज्यामुळेही काही लोकांना चक्कर आणि अस्थिर वाटू शकते. मात्र, चक्कर केवळ व्हिटामिन्सच्या कमतरतेने येते असे नाही. या मागे अनेक शारीरिक कारणे देखील असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी आणि रक्ताची तपासणी करता येऊ शकते.त्यामुळे योग्य कारणांचा पत्ता लागून योग्य उपचार करता येतो.

चक्कर येण्यासोबत या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये ? कमजोरी, खूप जास्त थकवा, धाप लागणे, धुसर दिसणे, हातापायांना मुंग्या येणे, चालताना अडचण येणे, शुद्ध हरपणे, वा डोकेदुखी वा छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. हे एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे संकेत देखील असू शकते. वारंवार चक्कर येत असेल तर कोणताही उशीर न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्याची तपासणी करुन घेणे चांगले असते.

वारंवार चक्कर आल्यानंतर काय करावे ? चक्कर येत असले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करुन उपचार सुरु करावेत. स्वत:च्या मनाने व्हिटामिन्स खाऊ नयेत. संतुलित आणि पौष्टिक डाएट घ्यावे , पुरेसे पाणी प्यावे आणि पुरेशी झोप घेणे देखील महत्वाचे असते. चक्कर सोबतच शुद्ध हरपणे, छातीत दुखणे, बोलताना अडथळे येत असतील, श्वास घेताना अडचणी येत असतील तर लागलीच डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने तातडीने उपचार सुरु करावेत.