
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. वायएसआर काँग्रेसचं सरकार असताना हा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकारण पेटलंय.

या प्राचीन आणि अध्यात्मिक मंदिराबाबत एक रहस्य आजही कायम आहे. हे रहस्य मंदिराशी संबंधित एका गावाच्या बाबतीत आहे. मंदिरासाठी वापरण्यात येणारी फुलं, दूध आणि लोणी हे सर्व एका खास गावातून येतात.



पुष्पमाळा देवाच्या विविध पूजाविधींसाठी वापरले जातात. पुष्प कक्षाच्या समोर आणि उत्तरेला पुला बावी- पुष्प विहिर आहे. देवाच्या पूजेसाठी वापरली जाणारी सर्व फुळं या विहिरीत जमा केली जातात.