
महाबळेश्वर शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. येथील हवामान थंड असते. निसर्गाने भरभरुन दान या भूमीला दिले आहे. यामुळे या ठिकाणी निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना पाहायला मिळतात. देशभरातील पर्यटक महाबळेश्वर येत असतात.

राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये देखील दमदार पाऊस पडला होता. त्यामुळे परिसर हिरवेगार झाला आहे. श्रावण महिन्यासारखा अनुभव पर्यटकांना येत आहे. सध्या महाबळेश्वरमधील अनेक पाईंटवर धुक्याची चादर दिसत आहे.

उन्हाळ्याच्या शेवटच्या हंगामामुळे महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पावसामुळे या ठिकाणचे सौंदर्य खुलले आहे. सध्या हा पूर्ण परिसर धुक्यामध्ये हरवलेला पाहायला मिळत आहे. यामुळे महाबळेश्वरमधील अनेक पॉईंटचे सौदर्य अधिकच वाढले आहे.

महाबळेश्वरमध्ये शनिवार आणि रविवार पर्यटकांची गर्दी अधिकच वाढत आहे. शाळांच्या सुट्या आणि शनिवारी अन् रविवारी विविध कार्यालयांना असलेल्या सुट्यांमुळे अनेकांची पावले पर्यटनाकडे वळत आहे. त्यासाठी महाबळेश्वरला पसंती दिली जात आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनबाबच चर्चा होत असताना सर्वात प्रथम महाबळेश्वरचे नाव येते. या भागात असलेली घनदाट जंगले आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर बसलेले अनेक पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स एक विलोभनीय दृश्य देतात.