देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. आरक्षणासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. जातीच्या आधारे आरक्षण द्यावं की आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ? या महत्त्वाच्या विषयावर आता कंगना राणौतनं मत मांडलं केलं आहे.
गरिबीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर कंगनानं जोर धरला आहे. गरिबीच्या आधारवरच नेहमी आरक्षण दिलं पाहिजे, असं कंगनानं ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.
जातीच्या नावावर आरक्षण देणं बरोबर नाही असं मत तिनं व्यक्त केलं आहे.
राजपूत समाज संकटात आहे, परंतु ब्राह्मणांची स्थिती पाहून तर वाईट वाटत असल्याची भावना कंगनानं व्यक्त केली आहे.
तिनं उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर तिला सोशल मीडियावर पाठिंबा मिळतोय.