
राज्याचे नाव: मिजोरम हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथून पायी चालत तीन भारतीय राज्ये आणि दोन देशांच्या सीमेला पोहोचता येते. मिजोरमची राजधानी आयझॉल आहे.

दोन देशांची सीमा: मिजोरमची सीमा पश्चिमेला बांगलादेश आणि पूर्व व दक्षिणेला म्यानमार या दोन देशांशी जोडलेली आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये पायी जाता येते.

तीन भारतीय राज्यांची सीमा: मिजोरमची सीमा त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांशी लागून आहे. त्यामुळे या 3 राज्यांमध्येही पायी जाता येते.

भौगोलिक वैशिष्ट्य: मिजोरम हे ईशान्य भारतातील डोंगराळ आणि निसर्गरम्य राज्य असून हिरवाई आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

साक्षरतेची कामगिरी: मिजोरमला भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे.