GK : भारतातील अद्भूत नदी, जी समुद्राला कधीच मिळत नाही

Unique River : भारतात शेकडो नद्या आहेत. यातील एक अशी एकमेव नदी आहे जी कधीच कोणत्याही समुद्राला मिळत नाही. या नदीचे नाव काय आहे? ती कुठून वाहते? तिचा शेवट कसा होतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 13, 2026 | 10:54 PM
1 / 5
उगम आणि प्रवाह : लुनी ही अशी नदी आहे जी कधीही समुद्राला मिळत नाही. या नदीचा उगम राजस्थानमधील अजमेर जवळील अरवली पर्वतरांगांमधील 'नागा' टेकड्यांवर होतो. ती राजस्थानमधून वाहत गुजरातमध्ये प्रवेश करते.

उगम आणि प्रवाह : लुनी ही अशी नदी आहे जी कधीही समुद्राला मिळत नाही. या नदीचा उगम राजस्थानमधील अजमेर जवळील अरवली पर्वतरांगांमधील 'नागा' टेकड्यांवर होतो. ती राजस्थानमधून वाहत गुजरातमध्ये प्रवेश करते.

2 / 5
समुद्राला का मिळत नाही? : ही नदी कोणत्याही समुद्राला मिळण्याऐवजी गुजरातच्या 'कच्छच्या रणा'त जाऊन लुप्त होते. कच्छचे रण हे एक दलदलीचे वाळवंट आहे, जिथे ही नदी स्वतःचे अस्तित्व संपवते.

समुद्राला का मिळत नाही? : ही नदी कोणत्याही समुद्राला मिळण्याऐवजी गुजरातच्या 'कच्छच्या रणा'त जाऊन लुप्त होते. कच्छचे रण हे एक दलदलीचे वाळवंट आहे, जिथे ही नदी स्वतःचे अस्तित्व संपवते.

3 / 5
खारे पाणी : 'लुनी' हे नाव संस्कृत शब्द 'लवणवरी' (खारे पाणी) वरून आले आहे. उगमस्थानी हे पाणी गोड असते, पण बाडमेर जिल्ह्यातील बालोतरा येथे पोहोचल्यावर ते अत्यंत खारे बनते, कारण तेथील जमिनीतील क्षारांचे प्रमाण जास्त आहे.

खारे पाणी : 'लुनी' हे नाव संस्कृत शब्द 'लवणवरी' (खारे पाणी) वरून आले आहे. उगमस्थानी हे पाणी गोड असते, पण बाडमेर जिल्ह्यातील बालोतरा येथे पोहोचल्यावर ते अत्यंत खारे बनते, कारण तेथील जमिनीतील क्षारांचे प्रमाण जास्त आहे.

4 / 5
हंगामी नदी : ही एक हंगामी नदी आहे. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाणी असते, मात्र उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ती अनेक ठिकाणी आटते.

हंगामी नदी : ही एक हंगामी नदी आहे. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाणी असते, मात्र उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ती अनेक ठिकाणी आटते.

5 / 5
ऐतिहासिक महत्त्व: वाळवंटी भागातील लोकांसाठी ही नदी जलसंजीवनी मानली जाते. शेती आणि पशुपालनासाठी या नदीचे महत्त्व राजस्थानच्या पश्चिम भागात अनन्यसाधारण आहे.

ऐतिहासिक महत्त्व: वाळवंटी भागातील लोकांसाठी ही नदी जलसंजीवनी मानली जाते. शेती आणि पशुपालनासाठी या नदीचे महत्त्व राजस्थानच्या पश्चिम भागात अनन्यसाधारण आहे.