GK : भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही?
India GK : भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आपल्या देशात असे एक राज्य आहे जिथे अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. या राज्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रेल्वे नसलेले राज्य : सिक्कीम हे सध्या भारतातील एकमेव राज्य आहे ज्याच्या मुख्य भूभागात रेल्वे स्टेशन नाही. या राज्याचा बराचसा भाग हिमालयाच्या उंच रांगांनी व्यापलेला असल्याने रेल्वे मार्ग तयार करणे खूप कठीण होते.

भौगोलिक अडथळे : सिक्कीमची भौगोलिक रचना अत्यंत दुर्गम आहे. येथे खोल दऱ्या, उंच पर्वत आणि भूस्खलनाचा धोका असतो. अशा ठिकाणी रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी कौशल्याची गरज असते.

सेवेक-रंगपो रेल्वे प्रकल्प : सिक्कीमला रेल्वे नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने सेवेक (पश्चिम बंगाल) ते रंगपो (सिक्कीम) या 45 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

जवळील रेल्वे स्टेशन : सध्या सिक्कीमला जाण्यासाठी पर्यटकांना पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी (NJP) किंवा सिलिगुडी या स्टेशनवर उतरावे लागते. तिथून पुढे 80 ते 100 किमीचा प्रवास रस्तेमार्गे (टॅक्सी किंवा बसने) करावा लागतो.

मेघालयची स्थिती : मेघालयमध्येही बराच काळ रेल्वे नव्हती, पण 2014 मध्ये मेंदीपाथर हे पहिले रेल्वे स्टेशन तिथे सुरू झाले. मात्र, राज्याची राजधानी शिलॉन्ग अद्याप रेल्वेने जोडलेली नाही.