GK : असे एक राज्य जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात झाले सामील

Unique State : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र स्वातंत्र्यावेळी भारतात खूप कमी राज्ये होती. मात्र कालांतराने नवीन राज्ये तयार झाली, एक असे राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात सामील झाले. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 17, 2026 | 10:16 PM
1 / 5
सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे  राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

सिक्कीम : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी सिक्कीम हे राज्य भारतात पूर्णपणे सामील झाले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिक्कीममध्ये 'चोग्याल' राजघराण्याची सत्ता होती. त्यावेळी सिक्कीम हे भारताचे एक 'संरक्षित राज्य'होते, ज्याचे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण भारत सरकार पाहत असे.

2 / 5
जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

जनतेची मागणी : 1970 च्या दशकात सिक्कीममधील जनतेने राजेशाहीविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाही स्थापन करून भारतासोबत पूर्णपणे विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली.

3 / 5
सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

सार्वमत : सिक्कीमच्या जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी 1975 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आले. या मतदानात सुमारे 97.5% जनतेने भारतासोबत सामील होण्याच्या बाजूने कौल दिला.

4 / 5
घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

घटनादुरुस्ती : सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी भारतीय संसदेने 36 वी घटनादुरुस्ती केली. यानुसार सिक्कीमला भारताचे घटकराज्य म्हणून दर्जा देण्यात आला. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य बनले.

5 / 5
राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.

राजेशाहीचा अंत : या विलीनीकरणामुळे सिक्कीममधील कित्येक वर्षांची 'चोग्याल' राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन झाले.