हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी काढली पण त्याच्याच अंडर रोहित आणि सूर्याला लागणार खेळावं, नेमकं कसं?
गौतम गंभीर कोच झाल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेचा पहिला दौरा करणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची गुरूवारी घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाची जबाबदारी दिली गेली आहे. मात्र पंड्या दावेदार असल्याची सर्वत्र चर्चा होती. पण सूर्याला कॅप्टन केलं पण तुम्हाला माहिती का भारताचे दोन्ही कर्णधार हार्दिकच्या अंडर खेळणार आहेत.

टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहेय T-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपल्यावर गंभीर कोच झाली आहे.


हार्दिक पंड्या वर्ल्ड कप संघाचाही उपकर्णधार होता. त्यामुळे पुढचा कर्णधार तोच असणार अशी सर्वांना खात्री होती पण सर्व काही उलटं झालं. पण असं असलं तरीसुद्धा टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार म्हणजेच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात खेळणार आहे.

हार्दिक पंड्याला कर्णधारपद सोडाच पण त्याचं उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं. शुबमन गिल याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.