पायलटच्या कॉकपिटमधून कसं दिसतं नरेंद्र मोदी स्टेडियम ?
वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजी करायला दिली. इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, हा सामना होण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध गायक प्रितम यांच्या संगीत रजनीपासून ते एयरो शो पर्यंतचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 मिनिटं चालेला हा शो अद्भूत, अद्वितीय असाच होता. नरेंद्र मोदी स्टेडियममधील प्रत्येकजण हा शो पाहताना हरखून गेला होता. याशिवाय पायलटच्या कॉकपिटमधून तर मोदी स्टेडियम अप्रतिम दिसत होता. त्याचे हे काही फोटो...

अहमदाबादेत वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखाहून अधिक लोक आले आहेत. यावेळी प्रेक्षकांसाठी खास रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हवाई दलाने नाणेफेकीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एअरो शो केला. 15 मिनिट हा शो चालला. डोळ्याचं पारणं फिटावे असा हा शो होता.

हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबेटीक टीमने हा एरो शो केला. त्यामुळे आकाशात अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा आकाशातील नजारा पाहून अनेकांचे डोळे दिपून गेले. पहिल्यांदाच अशा प्रकारचा शो पाहून प्रत्येकजण रोमांचित झाला होता.

विशेष म्हणजे मोदी स्टेडियममध्ये बसून प्रत्येकाला हा शो पाहता येत होता. शो सुरू होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रेक्षकांच्या आवाजाने दणाणून गेला. या शोची असंख्य फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

या शोसाठी हवाई दालची नऊ विमाने वापरण्यात आली. स्टेडियममध्ये तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. या शोचा आवाज इतका प्रचंड होता की आवाजामुळे सर्वच दंग झाले. सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त आकाशाकडे होतं.

पायलटच्या कॉकपीटमधून नरेंद्र मोदी स्टेडियम अद्भूत दिसत आहे. या स्टेडियमवरून नजरच हटत नाही इतकं विशाल हे स्टेडियम दिसत आहे. वायुदलाची ही सुर्यकिरण नावाची विमाने प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी राजधानीत प्रात्यक्षिकं सादर करीत असतात.

भारतीय प्रेक्षकांना आपल्या खेळाडूंकडून अनेक अपेक्षा आहेत. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारतच जिंकेल अशी आशा सर्वांना आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा टीव्हीवर खिळल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियासमोर कमी धावसंख्येचं आव्हान दिलं असलं तरी भारतीय गोलंदाजी हा सामना खेचून आणू शकते असा विश्वास भारतीयांना आहे.