
पतीने आपल्या पत्नीला कधीही त्याची कमकुवत बाजू सांगू नये. नाहीतर त्याच्या कमकुवत बाजूचा ती स्वतःच्या हेतूसाठी वापर करू शकतो. बायको त्याची समाजात लाज काढू शकते. तुमची कमकुवत बाजू तुमच्या पत्नीपासून कायम लपवा.

पती-पत्नीमधील नाते विश्वासावर अवलंबून असते. दोघांनी एकमेकांपासून काहीही लपवू नये. परंतु चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पत्नीपासून लपवून ठेवणे केव्हाही चांगले असते.

पतीने कधीही त्याच्या कमाईची संपूर्ण माहिती पत्नीला देऊ नये. जर तिला माहिती असेल की तिचा नवरा किती कमावतो, तर ती स्वत: ला अनावश्यक खर्च करण्यापासून रोखू शकणार नाही. कठीण काळात पैशाची कमतरता भासू शकते.

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, तुम्ही जे दान केले आहे ते कोणालाही सांगू नका. पतीने आपल्या पत्नीपासून ही गोष्ट लपवून ठेवावी की त्याने दानासाठी किती खर्च केले.

जर तुमचा कुठेतरी अपमान झाला असेल तर पतीने ही गोष्ट नेहमी पत्नीपासून लपवून ठेवावी. कारण कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. ती सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, ज्यामुळे अनावश्यक वाद होऊ शकतात.