
राज्यात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातही आकर्षकपद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यानिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांच्या सोबतच ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींवरही तिरंग्याच्या रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कुलाबा परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक ठिकाणीही तिरंग्याच्या आकारातील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर ही प्रशासनाने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.