
टीम इंडियाने वन डे मालिका जिंकली असून शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर बोलतान हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड मॅनेजमेंटने काळजीपूर्वक व्यवस्था केली नसल्याचं सांगितलं.

आम्ही वेस्ट इंडिज दौऱ्यावर परत येवू त्यावेळी ट्रावेलिंग आणि इतर गोष्टी चांगल्या असतील अशी आशा करतो. मागील दौऱ्यावर असतानाही अशीच परिस्थिती होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने यावर बारकाईने लक्ष द्यायला हवं, असं हार्दिक पंड्याने सांगितलं.

एकदम आलिशान नाही पण किमान पण सामान्य गरजांची तरी काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही इथे मजा केली आणि चांगलं क्रिकेट खेळल्याचं हार्दिक पंड्याने म्हणाला.

तिसऱ्या सामन्यासाठा येताना आमची फ्लाईट जवळपास 4 तास उशिरा आल्याचंही पंड्याने उघडपणे सांगितलं.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पंड्याकडून पॉवर हिटींग शॉट्स दिसले. अवघ्या 52 चेंडूत त्याने 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 सिक्सर्स आणि 4 चौकार मारले.