
टीम इंडिया आणि वेस्ट इमडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये चायनामना गोलंदाज कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे.

कुलदीप यादव याने आपल्या टी-20 करिअरमधील 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. या विकेटसह तो सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादव याने ही कामगिरी अवघ्या 30 डावांमध्ये केली आहे. तर यॉर्कर किंग बुमराह याने 41 तर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहल याने 34 डावांमध्ये 50 धावा विकेट पूर्ण केल्या होत्या.

ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना आऊट करत महत्त्वाची भूमिका बजावली.

तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांची मालिका 2-1 अशी झाली आहे.