
आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंची संपूर्ण टीम विशेष पाहुण्यांच्या रुपात बघायला मिळाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळाडूंना लाल किल्ल्याच्या तटबंदीवर आमंत्रित करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच परंपरा मोडून भारताच्या पंतप्रधानानं या खेळाडूंना देशासाठी खास असल्याचं वाटण्याची संधी दिली.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघानं केलेल्या कामाचा उल्लेख केला. त्याचा दमदार खेळ आणि कामगिरीबद्दल त्यांनी त्यांची प्रशंसा केली. त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा आदर केला. पीएम मोदी म्हणाले की, या खेळाडूंनी केवळ मनं जिंकली नाहीत तर देशातील कोट्यवधी तरुणांना खेळांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी विशेषतः टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या महिला खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि सांगितले की देश मुलींच्या या कामगिरीला नेहमी लक्षात ठेवेल.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं, काही भारतीय खेळाडू त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या रुपात दिसले. बॉक्सर मेरी कॉमचे सलामीचे फोटो लोकांच्या हृदयाला स्पर्श करताना दिसले, तर महिला तलवारबाज भवानी देवी आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल कॅमेऱ्याच्या एका फ्रेममध्ये दिसत होत्या. भारतीय नेमबाज संजीव राजपूतही उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषण सोहळ्यानंतर, पीएम मोदींनी लाल किल्ला सोडताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. त्यांनी त्यांना हात उंचावून नमस्कार केला आणि त्यांचा आदर केला.