
भारतातून कधीकाळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जात. भारतात आजही अनेक पुरातन मंदीर तसेच गुफांमध्ये सोनं आणि खजाना दडलेला आहे, असं मानलं जातं. अशाच पाच कथित खजान्यांविषयी जाणून घेऊ या..

बिहारमध्ये सोन भंडार नावाची गुहा आहे. या गुहेत सोनं लपवून ठेवलेलं आहे, असं मानलं जातं. या खजान्याला एक गुप्त द्वार आहे. गुहेवर हिलिलेली लिपी तुम्हाला समजली तर तुम्ही खजिन्याचं द्वार खोलू शकता, असं मानलं जातं.

केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदीर हे भारतातील सर्वांत पुरातन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात अनेक अब्जाधीशांपेक्षाही जास्त संपत्ती आहे. 2011 साली या मंदिराच्या तळघाराल खोलण्यात आलं होतं. या मंदिराच्या तळघारत सोनं, दागिने, मौल्यवान रत्न असा बराच खजीना सापडला होता. या खजिन्याची पूर्ण किंमत साधारण 1.2 लाख कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. न्यायालयाने या मंदिराच्या दुसऱ्या द्वारालाही खोलण्याचा आदेश दिला होता. पण तो अद्याप खोलण्यात आलेला नाही.

हैदराबादमध्ये किंग कोठी नावाचं एक ठिकाण आहे. हैदराबादचे शेवटचे निझाम मीर उस्मान अली यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती याच हवेलीत लपवून ठेवल्याचं म्हटलं जातं.

आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीला जगातील सर्वांत मौल्यवान आणि चर्चेत असलेल्या कोहिनूर हिऱ्यासाठी ओळखलं जातं. ही नदी म्हणजे सर्वांत मोठी हिऱ्यांची खाण आहे, असं म्हटलं जातं. जगातील 10 हिऱ्यांपैकी सात हिरे हे याच नदीतून मिळालेले आहेत.

राजस्थानमधील जयगड किल्ल्यामध्येही खजाना असल्याचं बोललं जातं. पंतप्रधान इंदिरा गांधीय यांमनी या खजान्याला शोधण्याचा आदेश दिला होता, असे मानले जाते. मात्र अद्याप हा दावा सत्य आहे, असे सांगणारा एकही पुरावा अद्याप सापडलेला नाही. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)