एक थेंबही पाणी मिळणार नाही, भारताचा पाकिस्तानला दणका, थेट आदेशाला केराची टोपली..
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. ज्यानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तान सिंधू नदीचे पाणी पुन्हा मिळावे, याकरिता प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातच आता मोठा झटका त्यांना मिळाला.

भारताने सिंधू जल करार पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित केला. हा करार भारताने स्थगित केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पाकिस्तान या करारावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी जागतिक कोर्टात धाव देखील घेतली.
काहीच होत नाहीये. भारताने सिंधू जल करारासंबंधी हेग स्थित ‘परमानेंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चा निर्णय फेटाळून लावला आहे. हेच नाही तर भारताने या कराराला केराची टोपली दाखवली आहे.
भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्याने पाकिस्तानमध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण झाली. कोर्टाच्या निर्णयाला भारताने थेट केराची टोपली दाखवली आहे. भारताने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनच्या निर्णयाला बेकायदेशीर अगोदरच म्हटले.
पाकिस्तानने नेदरलँड्सच्या न्यायालयात भारताविरोधात तक्रार केली. भारताने स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्ही न्यायालयाचे अधिकारक्षेत्र मानत नसल्याचे स्पष्ट केले. हा निकाल म्हणजे फक्त कागदाचा तुकडा असल्याचेही भारताने म्हटले.
अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानला यश मिळत नाहीये. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानच्या हातात काहीच नाहीये.