
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला 23 फेब्रुवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता चौथा सामना जिंकला तर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे.

टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यामध्ये बुमराह याच्या जागी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बीसीसीआयने टीमची घोषणा केल्यावर संघामध्ये एक खतरनाक बॉलरला घेतलं गेलं आहे. य बॉलरने रणजी सामन्यात दहा विकेट घेत महत्त्वाच भूमिका बजावली होती. आता हा खेळाडू थेट चौथ्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुकेश कुमार आहे. मुकेश कुमार याने पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. मात्र त्यानंतर सिराज आल्यावर त्याला संघातून बाहेर बसवण्यात आलं होतं. तिसरी कसोटी सुरू असताना बंगाल आणि बिहारमधील सामन्यात बंगालकडून खेळताना त्याने दहा विकेट घेतल्या होत्या.

चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.