
भारतातील रेल्वे नेटवर्क हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.