
जर तुम्हाला सुंदर केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता तुम्हाला काही बदल करावी लागतील. आपण केस खराब झाली तर फक्त शॅम्पूमध्ये बदल करतो

जर तुमचे केस खराब होत असतील तर शॅम्पूमध्ये बदल करणे पुरेसे नाही. याकरिता तुम्हाला दररोजच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करावी लागतील, त्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील.

जर केस गळत असतील आणि केसांमध्ये कोंडा झाला असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे बाजारातील वस्तू वापरण्यापेक्षा दही आणि लिंबू केसांना लावा, त्यामुळे समस्या दूर होते.

एक वाटी दह्यात लिंबू मिक्स करा आणि लावा. साधारणपणे वीस मिनिटे हे मिश्रण आपल्या केसांवर ठेवा. त्यानंतर केस धुवा, यामुळे कोंड्यासोबतच केस गळती थांबेल.

लक्षात ठेवा की, जर तुम्ही लिंबू आणि दही मिक्स करून लावत असाल तर कधीच फ्रीजमधून काढलेले दही केसांना लावू नका. यामुळे सर्दी होण्याची शक्यता अधिक होते.