
आद्रक अर्थात आले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की आले अन्न जलद पचण्यास मदत करते, सूज कमी करते आणि आतडे निरोगी ठेवते.

दररोज जेवणापूर्वी आद्रकचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय पचनक्रिया जलद होण्यासही मदत होते.

जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे अगोदर आल्याचे पाणी पिले पाहिजे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटात पित्त आणि एंजाइम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न चांगले पचते.

विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी आल्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. आल्याचे पाणी पिल्याने शरीर शांत होते शिवाय डिटॉक्सिफिकेशन वाढवण्यास मदत देखील होते.

पण जर तुम्हाला अॅसिडिटी असेल तर रात्री आल्याचे पाणी पिणे शक्यतो टाळा, नाही तर अॅसिडिटीची समस्या अधिक होईल. आल्याच्या मदतीने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.