AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली होती, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 3:35 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, तब्बल 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे आता अवघे 3 खासदारच आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षांकडून देखील या 6 खासदारांच्या गटाला शिवसेना शिंदे गटातील विलिनीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु आता शिवसेना ठाकरे गटाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बंडखोर खासदारांविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने एकाचवेळी शिवसेना ठाकरे गटाला दिलासा देखील दिला आहे, आणि झटका देखील दिल्याचं पहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणीस तयारी दर्शवण्यात आली आहे. परंतु बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला तातडीने स्थगिती द्यावी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली आहे.

याकिकेत काय म्हटलं?

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. लोकप्रतिनिधींकडून बंडखोरी सुरू आहे, यामुळे पक्ष कमोजर होत आहेत, हे जर असंच सुरू राहिलं तर संविधानातील 10 व्या अनुसूचीला काहीही अर्थ राहणार नाही, असा युक्तीवाद या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमाला बागची तसेच जस्टिस व्ही मोहाना यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका सुचीबद्ध करण्यास परवानगी दिली आहे. परंतु बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला तातडीने स्थगिती द्यावी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाकडून लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला तसेच प्रतिवादी पक्षाला नोटीस पाठवत उत्तर मागवण्यात आलं आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!