या अभिनेत्रीसोबत नातेवाईकाने केलेले गैरवर्तन, प्रेग्नेंट झाल्याचे भीतीने पपई खाणे केलेले सुरु, शेवटी…

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नातेवाईकाने केलेले गैरवर्तन. घाबरलेली अभिनेत्री. प्रेग्नेंट झाल्याचे भीतीने पपई खाण्यास केलेली सुरुवात. नेमकं काय घडलं?

| Updated on: May 03, 2026 | 8:24 AM
1 / 5
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण करणारी कनिका मान सध्या चर्चेत आली आहे. ‘नागिन 7’ मालिकेत दिसणाऱ्या कनिका मानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण करणारी कनिका मान सध्या चर्चेत आली आहे. ‘नागिन 7’ मालिकेत दिसणाऱ्या कनिका मानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

2 / 5
एका मुलाखतीत कनिका मानने सांगितले की, लहानपणी तिच्या एका नातेवाईकाने तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्या वेळी ती केवळ चौथीत शिकत होती आणि तिला या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती.

एका मुलाखतीत कनिका मानने सांगितले की, लहानपणी तिच्या एका नातेवाईकाने तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्या वेळी ती केवळ चौथीत शिकत होती आणि तिला या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती.

3 / 5
ती म्हणाली, मला तेव्हा समजत नव्हतं की बाळ कसं होतं. त्या घटनेनंतर मी इतकी घाबरले होते की मला वाटायला लागलं की मी प्रेग्नंट होईन. तिने घरातील मोठ्यांकडून ऐकले होते की पपई खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे भीतीपोटी तिने पपई खाणे सुरू केले.

ती म्हणाली, मला तेव्हा समजत नव्हतं की बाळ कसं होतं. त्या घटनेनंतर मी इतकी घाबरले होते की मला वाटायला लागलं की मी प्रेग्नंट होईन. तिने घरातील मोठ्यांकडून ऐकले होते की पपई खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे भीतीपोटी तिने पपई खाणे सुरू केले.

4 / 5
या गोष्टीतून तिच्या मनात किती भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता हे स्पष्ट होते. त्या काळात तिने ही घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली नव्हती. कारण, तिला भीती होती की दोष तिच्यावरच टाकला जाईल. अनेक मुलांना अशा परिस्थितीत ज्या प्रकारची भीती वाटते, तसाच अनुभव तिलाही आला होता.

या गोष्टीतून तिच्या मनात किती भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता हे स्पष्ट होते. त्या काळात तिने ही घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली नव्हती. कारण, तिला भीती होती की दोष तिच्यावरच टाकला जाईल. अनेक मुलांना अशा परिस्थितीत ज्या प्रकारची भीती वाटते, तसाच अनुभव तिलाही आला होता.

5 / 5
काही वर्षांनंतर कनिका मानने ही घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्या अनुभवाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता आणि त्या धक्क्यातून बाहेर पडायला तिला बराच काळ लागला.

काही वर्षांनंतर कनिका मानने ही घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्या अनुभवाचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता आणि त्या धक्क्यातून बाहेर पडायला तिला बराच काळ लागला.

Follow Us