लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता त्याची पत्नी अंकिताने मौन सोडलं आहे. अंकिता नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 09, 2026 | 11:48 AM
1 / 5
'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'कहानी घर घर की', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेता करण पटेल घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यावरचा शाहरुख खान म्हणून तो ओळखला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो मालिकांपासून दूर आहे.

'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'कहानी घर घर की', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेता करण पटेल घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यावरचा शाहरुख खान म्हणून तो ओळखला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो मालिकांपासून दूर आहे.

2 / 5
दारुच्या व्यसनामुळे करण टीव्ही इंडस्ट्रीपासून लांब गेल्याचं म्हटलं जातं. अशातच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव घटस्फोट घेत असल्याची ही चर्चा आहे.

दारुच्या व्यसनामुळे करण टीव्ही इंडस्ट्रीपासून लांब गेल्याचं म्हटलं जातं. अशातच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव घटस्फोट घेत असल्याची ही चर्चा आहे.

3 / 5
घटस्फोटाच्या चर्चांवर अंकिताने 'टेली मसाला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे. या मुलाखतीत ती म्हणाली, "जे लोक करणबद्दल चुकीचं बोलत आहेत, ते त्यांचे शब्द आहेत. दोन वर्षांनंतर त्यांना या गोष्टीची जाणीव होईल. त्यामुळे मी कोणाबद्दल चुकीचं बोलन माझे पाप का वाढवू?"

घटस्फोटाच्या चर्चांवर अंकिताने 'टेली मसाला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे. या मुलाखतीत ती म्हणाली, "जे लोक करणबद्दल चुकीचं बोलत आहेत, ते त्यांचे शब्द आहेत. दोन वर्षांनंतर त्यांना या गोष्टीची जाणीव होईल. त्यामुळे मी कोणाबद्दल चुकीचं बोलन माझे पाप का वाढवू?"

4 / 5
"मला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही आणि मी त्याच्याबद्दल विचारसुद्धा करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे सर्वांबद्दल चांगलं बोला आणि चांगले विचार करा. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या वेळीही मला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं", अशा शब्दांत अंकिताने नाराजी व्यक्त केली.

"मला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही आणि मी त्याच्याबद्दल विचारसुद्धा करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे सर्वांबद्दल चांगलं बोला आणि चांगले विचार करा. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या वेळीही मला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं", अशा शब्दांत अंकिताने नाराजी व्यक्त केली.

5 / 5
"त्यामुळे आता मी फक्त लोकांच्या सकारात्मक टिप्पण्यांचाच विचार करते. बाकी करणबद्दल जे काही बोललं जातंय, ते ठीक आहे. त्यात कोणी कायच करू शकतं", अशी प्रतिक्रिया अंकिताने दिली आहे. बऱ्याच वर्षांनंतर करण 'द 50' या शोमध्ये झळकला होता. परंतु त्यातूनही तो दहा दिवसांतच बाहेर पडला होता.

"त्यामुळे आता मी फक्त लोकांच्या सकारात्मक टिप्पण्यांचाच विचार करते. बाकी करणबद्दल जे काही बोललं जातंय, ते ठीक आहे. त्यात कोणी कायच करू शकतं", अशी प्रतिक्रिया अंकिताने दिली आहे. बऱ्याच वर्षांनंतर करण 'द 50' या शोमध्ये झळकला होता. परंतु त्यातूनही तो दहा दिवसांतच बाहेर पडला होता.

Follow Us