
लग्न नेमकं कधी करावं? लग्नाचं योग्य वय काय? असं नेहमी विचारलं जातं. काही तरुण-तरुणी वयाची तिशी पार झालेली असली तरी लग्न करत नाहीत. तर काही तरुण-तरुणी एकवीस-बावीसाव्या वर्षातच लग्न करतात.

दरम्यान, आता कथावाचक जया किशोरी यांनी लग्न कधी करावं? याबाबत नेमकी माहिती दिली आहे. त्यांच्या या मताची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. जया किशोरी यांच्या म्हणण्यांनुसार जेव्हा मुलगा-मुलगी दोघेही समजदार आणि त्यांचे निर्णय घेण्यास सक्षम होतील, तेव्हा त्यांनी लग्न करावं.


लग्न कोणत्या व्यक्तीशी करायला हवं? याबद्दलही जया किशोरी यांनी सांगितलंय. सारासार विचार करूनच लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. लग्नास होकार देण्याआधी आपल्या भावी जोडीदाराचा स्वभाव कसा आहे, हे अगोदर समजून घ्यावे, असे जया किशोरी सांगतात.

तसेच, एखाद्या व्यक्तीच्या सर्वच सवयी चांगल्या वाटत असतील अशा व्यक्तीशी लग्न न करता ज्या व्यक्तीच्या कमतरता स्वीकार करण्याची तुमची तयारी आहे, त्याच व्यक्तीशी लग्न करा, असा सल्ला जया किशोरी यांनी तरुण-तरुणींना दिला आहे.