
100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची पाण्याची गरज ओळखून राजर्षी शाहू महाराज यांनी भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधलं.

चुना आणि शिसे यांच्या मिश्रणातून हे राधानगरी धरण बांधण्यात आलं आहे. हे धरण 100 वर्षानंतरही धरण जसंच्या तसं उभं आहे.

राधानगरी धरणाचं बांधकाम दगडात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते आजही भक्कम आहे. या धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे.

स्वयंचलित दरवाजे असणारं हे देशातील एकमेव धरण आहे. 8 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची या धरणाची क्षमता आहे.

Radhanagari Dam