
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांच्या नीति शास्त्राच सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी मनुष्याला त्याच्या कर्माच्याआधारे अनेक श्रेणीमध्ये विभाजित केलं आहे. त्यांचा स्वभाव आणि गुणांबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या या नीती जर आपण आपल्या आयुष्यात लागू केल्या तर त्यामुळे तुमच्या जीवनाची रुपरेषा बदलू शकते

आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. लग्न ही माणसाच्या आयुष्यातील महत्वाची घटना आहे. जर तुम्ही लग्नासाठी मुली बघत असाल तर मुलीमध्ये कोणते गुण असावेत याची माहिती आचार्य चाणक्य यांनी दिली आहे.

मुलीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर होत नाही आहे ना याची शहानिशा नक्की करावी. नाहीतर अशी पत्नी तुम्हाला काधीही सुख देऊ शकणार नाही. मनाच्या विरुद्ध ती तुमच्या सोबत राहील.

जेव्हा तुम्ही कोणत्या मुलीला लग्नासाठी पाहायला जालं तेव्हा त्या मुलीला धर्माप्रती किती प्रती किती प्रेम आहे हे पाहावे. आपल्या संस्कृतीची किती माहिती आहे याचा विचार करावा. हा गुण असणाऱ्या मुली पुढच्या पिढीला ही उत्तम प्रकारे घडवू शकतात.

जी मुलगी वडिधाऱ्या माणसांचा आदर करत असेल. काळासोबत स्वत:मध्ये बदल करत असेल अशी मुली सोबत तुम्ही लग्न करु शकता. असे आचार्यांनी सांगितले आहे.