राज्यात धो धो पाऊस कधी? मोठा अंदाज, दुष्काळाचे सावट? थेट..
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यातच आता चिंता अधिक वाढली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

राज्यात पावसाने पाठ फिरवली. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पाऊस गायब आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पाऊस नसेल. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.
पिके संकटात आहेत. जुलै महिना सोडला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र, परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. एल निनोचे सावट पावसावर असल्याचे सांगितले जातंय.
त्यातच आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता अनेक भागात आहेत.
पंजाबराव डग पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सध्यातरी पाऊस कोसळताना दिसत नाही. अनेक भागात दुष्काळाची स्थिती बघायला मिळतंय.
दुष्काळाचे मोठे सावट आहे. पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी संकटात येऊ शकतात. परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यात स्थिती अधिक गंभीर आहे.