
महापालिकेच्यावतीने मुंबईतील हॉटेल आणि ढाब्यातील कोळशाच्या भट्टी बंद करण्याचे आदेश

त्यामुळे मुंबईतील खवय्यांना आता कोळशाचा भट्टीवरील तंदूर रोटी विसरावी लागणार

मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने हॉटेल्स आणि ढाबा, रेस्टॉरंटला नोटीस देत इशारा दिला आहे.

८ जुलैपर्यंत हॉटेल ढाबा धारकांना इलेक्ट्रिक, सीएनजी, पीएनजीवर आधारित उपकरणांवर तंदुरी रोटी तयार करावी लागणार आहे

जे ढाबा, हॉटेल्स, रेस्टॉरंट चालक भट्टी बदलणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

ढाबा चालकांना त्यांच्या हॉटेलचा परवाना रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जावे लागेल