
भारतासह वेगवेगळ्या शहरात प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. मात्र त्यामध्ये मुंबईचा क्रमांक वरचा लागतो.

धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईची हवा ही दिल्लीपेक्षा अधिक धोकादायक झाली आहे. विविध शहरांचा AQI एअर क्वॉलिटी इंडेक्स समोर आला आहे.

त्यामध्ये दिल्लीचे AQI 170 इतके आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा AQI हा 196 इतका आहे. असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. इतर शहरांचा एअर क्वॉलिटी इंडेक्सही त्यात देण्यात आला आहे. नॉएडा 164, गुडगाव 165, फरीदाबाद 167, गाजियाबादचा एक्यूआय 177 इतका आहे.

तर पाटणा 164, लखनऊ 113, बँगलोर 129, चंदीगडचा 89 इतका एक्यूआय आहे. तर आग्रा 77 , वाराणसीचा एक्यूआय सर्वात कमी 42 आहे.

जयपूर 124, अहमदाबाद 159, इंदौर 155, भोपाळ 75 , कानपूर चा 78 असल्याची माहिती समोर आली आहे.