
आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी जपूनच करण आवश्यक आहे.नाही तर त्याचा फटका आपल्याला भविष्यात बसू शकतो. अनेकदा आपण पत्नीशी निगडीत गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करतो. पण तसं केल्याने आपण अडचणीत येऊ शकतो. याबाबत चाणक्य नीतित सांगण्यात आलं आहे.

जर तुम्ही पत्नीच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज असाल तर त्या गोष्टीचा उल्लेख इतर कोणाकडेही तक्रार म्हणून करू नये. जी व्यक्ती आपल्या पत्नीबद्दल इतरांकडे तक्रार करतो. तेव्हा तो पत्नीसह हसण्यास पात्र ठरतो.


जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातील कमकुवत बाजू बाहेर उघड केली तर त्याचा परिणाम त्याच्या आणि पत्नीच्या सन्मानावर होतो. लोकं त्याना समाजात वेगळ्याच नजरेने पाहतात.

आचार्य चाणक्य नीतिनुसार, पती पत्नीतील वाद आणि गुपितं घरातच राहिल्या पाहिजेत. जर तसं केलं नाही तर त्याचा फायदा इतर लोकं घेऊन मानसिक त्रास देऊ शकतात.