ना आवारापन 2, ना बंटवारा 1947.. कोणताच गाजावाजा न करता रवीना टंडनच्या सिनेमाची बाजी; 2 दिवसांत 75 कोटी
सनी देओलच्या 'बंटवारा' या चित्रपटापेक्षा 300 टक्क्यांनी अधिक कमाई रवीना टंडनच्या चित्रपटाने केली आहे. फक्त दोन दिवसांत तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा चित्रपट नेमका कोणता आहे, ते जाणून घ्या..

14 ऑगस्ट 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांची तुफान चर्चा झाली. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2' आणि सनी देओलच्या 'बंटवारा 1947'चा समावेश आहे. पण या दोन चित्रपटांच्या चर्चेत कोणताही गाजावाजा न करता एका दाक्षिणात्य चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. रवीना टंडन आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटसुद्धा 14 ऑगस्ट रोजीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

या चित्रपटाचं नाव आहे 'विश्वनाथ अँड सन्स'. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या आकड्यांनुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 55.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कलेक्शनचा आकडा 76.47 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडच्या दोन मोठ्या चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास, इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने भारतात 55.75 कोटी रुपये आणि जगभरात 72.90 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसरीकडे सनी देओलच्या 'बंटवाला 1947'ने भारतात 19.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अभिनेता सूर्या हा एक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखला जातो. परंतु 'विश्वनाथ अँड सन्स' या चित्रपटाच्या निमित्ताने तो अठरा वर्षांनंतर रोमँटिक कॉमेडी चित्रपटात कमबॅक करत आहे. वेंकी अटलुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्या, ममिथा बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा संजय विश्वनाथ (सूर्या) या 42 वर्षीय ऑलिम्पिक पदक विजेता आणि व्यावसायिकाभोवती फिरते, जो काही कारणास्तव लग्न करण्यास नकार देतो. परंतु त्याची आई निर्मला देवी (राधिका) यांना त्यांचा कौटुंबिक वारसा पुढे चालवण्याची इच्छा असल्याने अखेर संजय सरोगसीद्वारे वडील बनतो. मात्र त्या मुलाला अचानक एक गंभीर आजार झाल्याने कुटुंबाला त्याच्या उपचारासाठी सरोगेट आई मडी (ममिता बैजू) हिला बोलवावं लागतं. या चित्रपटात रवीना टंडनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.