Photo : जुनं ते सोनं; ‘या’ आहेत देशातील सर्वात जुन्या कंपन्या
भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. (Old is gold, these are the oldest companies of India )

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना 284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.