
पाकिस्तानचा वादग्रस्त फिरकी गोलंदाज उस्मान तारिकने अखेर भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आपलं मौन सोडलं आहे. त्याने दुखावलेल्या पाकिस्तानी चाहत्यांना आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या पराभवातून बाहेर येऊन पुढच्या फेरीत म्हणजे सुपर 8 मध्ये स्थान मिळवू असा विश्वास त्याने व्यक्त केला.

भारताकडून 61 धावांनी पराभव झाल्यामुळे पाकिस्तानसाठी आता पुढचा सामना करो या मरो असेल. ग्रुप ए च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला नामीबियाला हरवावचं लागेल. बुधवारी कोलंबो येथे हा सामना होणार आहे. नामीबिया विरुद्ध जिंकले तरच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल.

पाकिस्तानचा उद्या पराभव झाला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. सध्या ते ग्रुप ए मध्ये अमेरिकेच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहेत. नेट रनरेटमध्ये पाकिस्तान अमेरिकेपेक्षा मागे आहे. काल ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला.

ज्यावेळी तुम्ही तुमच्या चुकांवर काम करत नाही, तेव्हा संघाची कामगिरी उंचावणं कठीण असतं. आम्ही आमच्या चुकांवर केलय. त्यामुळे आव्हान कठीण नसेल असा विश्वास उस्मान तारिकला आहे.

पुन्हा त्याचं चुका करायच्या नाहीत हा आम्हाला संकल्प करावा लागेल. संपूर्ण देशाने सामना बघितला त्यामुळे चाहत्यांची निराशा आम्ही समजू शकतो असं उस्मान तारिक म्हणाला. मला खात्री आहे. पुढच्यावेळी आम्ही जेव्हा भारताविरुद्ध खेळू तेव्हा आमचं प्रदर्शन जास्त चांगलं असेल असं उस्मान तारिकला वाटतं