पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई; पण भारतातही तुफान क्रेझ, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल
Pakistans National Sweet : जगभरात अनेक प्रकारच्या मिठाई खाल्ली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई ही भारतीयांना आवडणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ कोणता ते सविस्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तानात शाही टुकडा, फिरनी, शीर खुरमा, सेवईया, गुलाब जामून आणि लब-ए-शिरीन यांसारख्या अनेक पारंपरिक मिठाई प्रसिद्ध आहेत. मात्र यातील एका पदार्थाची लोकप्रियता सर्वाधिक मानली जाते.

पाकिस्तानमध्ये गुलाब जामुनला राष्ट्रीय मिठाईचा दर्जा देण्यात आला आहे. ही मिठाई तिथे सण, समारंभ आणि खास प्रसंगी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. गोड चव आणि मऊ पोतामुळे ती लोकांची फेव्हरेट मिठाई बनली आहे.

गुलाब जामुनचा इतिहास मध्य आशिया आणि इराणशी जोडला जातो. काही अहवालांनुसार, तळलेल्या गोड पदार्थापासून या मिठाईची निर्मिती झाली. नंतर ती साखरेच्या पाकात भिजवून खाल्ली जाऊ लागली.

भारतातही गुलाब जामुन मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. लग्नसमारंभ, सण आणि इतर खास कार्यक्रमांमध्ये ही मिठाई आवर्जून ठेवली जाते. अनेक राज्यांमध्ये ती लोकांची पहिली पसंती आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये गुलाब जामुनची सर्वाधिक लोकप्रियता पाहायला मिळते. गरमागरम गुलाब जामुन खाण्याची मजा लोक मोठ्या आवडीने घेतात. त्यामुळेच या मिठाईची मागणी कायम असते.