
दुष्ट आणि नीच स्वभावाच्या लोकांना नरक यातना भोगाव्या लागतात. इतरांना त्रास देणाऱ्या लोकांना नरकात जागा मिळते. अशा लोकांना कधीच स्वर्गात जागा मिळत नाही.

रागाच्या भरात लोकं स्वत:वर ताबा ठेवू शकत नाही. रागात चुकीचं काम करून बसतात. अशा लोकांना नरकात जावं लागतं.

आपल्या प्रियजनांचा द्वेष करणाऱ्या लोकांनाही नरक यातना भोगाव्या लागतात. आपल्याच जवळच्या व्यक्तींसोबत वाईट हेतूने वागणं मृत्यूनंतर महागात पडतं.

नीच लोकांच्या सान्निध्यात राहून त्यांना मदत केल्यास त्यांच्या पापाचे धनी होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, नीच माणसांची सेवा आणि त्यांची चाकरी करणारे लोकं मृत्यूनंतर नरकात जातात.

दुसऱ्याचा तिरस्कार करत त्यांच्याबाबत कटू बोलणं लोकांच्या दु:खाचं कारण ठरतं. कटु विधान हृदयाला भिडतात. अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या व्यक्तींना नरक यातना भोगाव्या लागतात.