Photo : भारतातील 5 शहरं, ज्यांची नावं राक्षसांच्या नावावरुन ठेवण्यात आली!

| Updated on: May 10, 2021 | 11:32 AM

आपल्या देशात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावं महान व्यक्ति, क्रांतिकारक, राजकारणी आणि शहीदांच्या नावांवर आहेत. देवाच्या नावावरही तुम्ही अनेक ठिकाणांची नावं पाहिली असतील. मात्र आम्ही तुम्हाला अशा शहरांची नावं सांगतोय ज्यांची नावं प्राचीन काळातील भुतांच्या नावांवरुन ठेवली गेली आहेत. (5 cities in India, named after monsters!)

1 / 5
म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

2 / 5
पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

3 / 5
बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

4 / 5
पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

5 / 5
तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.

तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.