
सणासुदीच्या काळात लोक रेल्वेने प्रवास करत असता.त्यामुळे तिकीट बुकींग करताना खूप त्रास होता. त्यामुळे भारतीय रेल्वेने एक योजना जाहीर केली आहे.त्याद्वारे रिटर्न तिकीटावर २० टक्के सूट मिळणार आहे.

१४ ऑगस्ट २०२५ पासून ही ऑफर सुरु होणार असून या योजनेचा प्रवास १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सुरु व्हायला पाहिजे तर परतीचा प्रवास हा १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान असायला हवा. रिटर्न तिकीटावरील सुट केवळ बेस फेअरवर मिळणार आहे. ही योजना खास करुन सणासुदीसाठी आहे.

ही योजना सणासुदीच्या सिझनसाठी तयार केली आहे.या योजनेत सिंगल जर्नी आणि रिटर्न जर्नी दरम्यान तिकीटांची व्यवस्था करणे हा आहे. यात खर्च कमी करणे आणि दोन्ही दिशेच्या ट्रेनचा प्रवास वाढवणे हा आहे . त्यामुळे विशेष ट्रेनचा योग्य प्रकारे वापर केला जाणार आहे.

रिटर्न तिकीटवर केवळ बेस फेअरवर २० टक्के सुट मिळणार आहे. तिकीट दोन्ही प्रवासात एकाच श्रेणीची तिकीटे काढावी लागणार आहेत. एकच श्रेणी, ट्रेन, प्रवासी आणि मार्गाचा निश्चित असणे अनिर्वाय आहे.

तिकीटात कोणताही रिफंड, दुरुस्ती वा अन्य सुट ( पास, वाऊचर, सवलत ) मान्य असणार नाही. बुकींग ऑनलाईन वा काऊंटर दोन्हीपैकी एका माध्यमातून करायला हवे.रिटर्न तिकीट देखील त्याच माध्यमातून काढायला हवे.ही ऑफर फ्लेक्सी-फेअर ट्रेन मॉडेल ( उदा. राजधानी, शताब्दी आदी ) लागू असणार नाही.

ही योजना प्रवाशांना कमी खर्चात सणात प्रवासाची संधी देणार आहे. यामुळे स्टेशनवरील गर्दी कमी होईल आणि ब्लॉकबस्टर ट्रेन भार संतुलित होईल.प्रवाशांना जाताना आणि येतानाचे दोन्ही तिकीट मिळण्याची खात्री होईल, त्यामुळे शेवटच्या मिनिटांपर्यंत असणारी धास्ती कमी होईल.

१४ ऑगस्टपासून आरक्षण प्लेटफॉर्म (IRCTC वा स्टेशन काऊंटर) वर लॉगिन करावे. "Connecting Journey" पर्यायाद्वारे जातानाचे तिकीट निवडावे. रिटर्न तिकीट त्याच मोड आणि तपशिलासह निवडावे, तेव्हाच योजना लागू असेल. तिकीट बुक झाल्यानंतर रिटर्न तिकीटावर २० टक्के सूट आपोआप लागू होईल.