Photo : स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरात भव्य ‘विश्वशांति महायज्ञ’

आज देशभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच दिल्लीच्या स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरातही दसऱ्याच्या पवित्र पर्वावर विश्वशांती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. संतांचे पवित्र मंत्र आणि आशीर्वादामुळे संपूर्ण वातावरण यावेळी भारून गेलं होतं.

| Updated on: Oct 02, 2025 | 1:20 PM
1 / 5
आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. प्रत्येकजण एकमेकांना आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देत आहे. नवी दिल्लीतील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरातही दसऱ्याच्या पवित्र पर्वावर विश्वशांती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. वैश्विक शांती, सद्भावनेला प्रोत्साहन देण्याचा संकल्प करतानाच वैदिक परंपरेनुसार अनुष्ठाणही करण्यात आलं. यावेळी हजारो भाविकांनी उत्साहाने भाग घेतला.

आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. प्रत्येकजण एकमेकांना आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देत आहे. नवी दिल्लीतील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरातही दसऱ्याच्या पवित्र पर्वावर विश्वशांती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. वैश्विक शांती, सद्भावनेला प्रोत्साहन देण्याचा संकल्प करतानाच वैदिक परंपरेनुसार अनुष्ठाणही करण्यात आलं. यावेळी हजारो भाविकांनी उत्साहाने भाग घेतला.

2 / 5

पहाटे 6 वाजता हा महायज्ञ सुरू झाला. सकाळी 9 वाजेपर्यंत हा महायज्ञ सुरू होता. संतांनी वैदिक मंत्रांचं पठण करतानाच आध्यात्मिक ऊर्जेचंही आवाहन केलं. या समारंभात 108 यज्ञ कुंडांना सामील करून घेण्यात आलं होतं.

3 / 5

यावेळी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचे मुख्य प्रभारी संत पूज्य मुनिवत्सलदास स्वामी यांनी संबोधित केलं. परम पूज्य महंतस्वामी महाराज यांची दिव्य प्रेरणा आणि मार्गदर्शनात हा यज्ञ जगात शांतता आणि सद्भावनेसाटी आयोजित करणअयात आला आहे, असं संत मुनिवत्सलदास म्हणाले. प्रत्येक कुटुंब एकजूट राहावं, मजबूत बनावं आणि आध्यात्मिक मूल्य कायम राहावे, अशी विशेष प्रार्थना यावेळी करण्यात आली. आपण या पवित्र यज्ञातून प्रेरणा घेऊन कौटुंबिक एकता आणि आध्यात्मिकतेला हृदयापासून आत्मसात करावं, असंही ते म्हणाले.

4 / 5

Grand Vishwaया यज्ञाच्यावेळी तरुणाईंची मोठी उपस्थिती होती. यावेळी ट्विकल नावाच्या तरुणीने प्रतिक्रिया व्यक्त केली. विश्वशांती महायज्ञाच्या शुभ प्रसंगी श्रद्धाळू भक्ती आणि तपाच्या आनंदाने उल्हासित होते. त्यांनी वैश्विक शांती, सद्भावना आणि प्रेमसाठी प्रार्थना केली. त्यासोबतच विजयादशमीच्या पर्वाच्या खऱ्या अर्थाला आत्मसात करण्याचा संदेशही आत्मसात केला, असं ट्विंकल म्हणाली. shanti Mahayagna (5)

5 / 5

भक्तांनी आपल्या जीवनात नकारात्मकता, अहंकार आणि घृणेला दूर ठेवण्याची आज शपथ घेतली. अक्षरधाम मंदिराचं संपूर्ण वातावरण आज आध्यात्मिक ऊर्जेने भारलेलं होतं. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us