
बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांच्या निधनाला आज (29 एप्रिल) एक वर्ष पूर्ण होत आहे. इरफानने जरी या जगाचा निरोप घेतलेला असला, तरी आजही त्याच्या आठवणी फक्त त्यांच्या कुटुंबातच नाही, तर चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे काही फेमस डायलॉग आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘सिर्फ इंसान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता हैं….’ या डायलॉग आहे डी-डे या चित्रपटातील. हे वाक्य आयुष्यात खूप महत्त्वाचे वाटतात.

पान सिंह तोमर या चित्रपटातील ‘भीड में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लिमेंट मे…’हा डायलॉग प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता.

‘गलतियां भी रिश्तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती हैं…’ हा सुद्धा डी-डे या चित्रपटातील एक महत्त्वाचा डायलॉग आहे.

मोहोब्बत थी इसलिये जाने दिया, ज़िद होती तो बाहोंमें होती… हा डायलॉग मुख्यत: तरुणांना प्रचंड आवडलेला डायलॉग आहे.

तलवार मर्डर केसवर आधारित तलवार या चित्रपटातील ‘किसी भी बेगुनाह को सज़ा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें.’हा डायलॉग आहे.

‘बडे शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है.’ द किलर या चित्रपटातील हा डायलॉग सत्य परिस्थितीची जाणीव करुन देतो.

‘ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्यादा हम से ले लेता है.’ लाईफ इन मेट्रो या चित्रपटातील हा डायलॉग आहे.

‘तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा.’ मदारी चित्रपटातील हा डायलॉग इरफान खान यांचा फेमस डायलॉग आहे.

‘आदमी का सपना तूट ज्याता हैं ना, तो आदमी खतम हो जाता हैं…’ अंग्रेजी मिडीयम या चित्रपटातील हा डायलॉग आहे.

लंच बॉक्स या चित्रपटातील 'Sometimes The Wrong Train Takes You To The Right Destination' हा डायलॉग कदाचित प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आयुष्याशी संबंधित आहे..