
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्राने विरोचकाचा वध केला आहे. त्यानंतर ती तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करते.

नेत्राला जाणवू आणि दिसू लागतं की जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र एकमेकींविरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडीत असलेल्या गोष्टींना स्वीकारते. पण रिमाला मात्र देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही.

अशीच काहीशी गोष्ट कोलकातामधे घडते. जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते.

डॉ. मैथिली सेनगुप्ता म्हणून एका डॉक्टरच्या कानात ती किडारुपी शक्ती शिरते. मैथिली सेनगुप्ताचं वागणं बदलून जातं आणि एकाक्षणी मैथिलीमधे शिरलेली शक्ती रूप घेते आणि नवा राक्षस जागा होतो.

एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते. त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.