दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा जवळचे मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.
दियानं खुद्द माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये लग्नाच्या निमित्तानं गोड पदार्थ वाटले.
पांढऱ्या रंगाचा कुर्ता, लेंगा, फेटा असा वैभवचा लूक होता. तर, लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये दियाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
दिया मिर्झा लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.