Virat Kohli : आशिया आणि वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला एबी डिव्हिलियर्सने दिला कानमंत्र, म्हणाला…

Asia Cup 2023 : आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून हाच वर्ल्डकपसाठी असेल असं बोललं जात आहे. श्रेयस अय्यर फीट अँड फाईन झाल्याने चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला आहे. पण एबी डिव्हिलियर्सने टीम इंडियाला कानमंत्र दिला आहे.

| Updated on: Aug 26, 2023 | 10:39 PM
1 / 7
अवघ्या काही दिवसांवर आशिया चषक स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया स्पर्धेपूर्वी लिटमस टेस्ट असणार आहे. टीम इंडियासमोर चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रश्न असताना श्रेयस अय्यरने एन्ट्री घेतली आहे. पण एबी डिव्हिलियर्सने टीम इंडियाला सल्ला दिला आहे.

अवघ्या काही दिवसांवर आशिया चषक स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया स्पर्धेपूर्वी लिटमस टेस्ट असणार आहे. टीम इंडियासमोर चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रश्न असताना श्रेयस अय्यरने एन्ट्री घेतली आहे. पण एबी डिव्हिलियर्सने टीम इंडियाला सल्ला दिला आहे.

2 / 7

चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर संघात परतला आहे. पण त्याचा फॉर्मबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे मत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे.

3 / 7

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यानेही रवि शास्त्रीच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. एबी डिव्हिलियर्सने सांगितलं की, कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली तर टीम इंडियासाठई चांगलं ठरेल.

4 / 7

विराट कोहली कोणत्याही स्थितीत फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर खेळावे. या स्थावर खेळण्यास तोच योग्य खेळाडू आहे.

5 / 7

या क्रमांकावर विराट कोहलीला फलंदाजी करायला आवडेल की नाही हे मला माहिती नाही.पण संघाला गरज असेल तर त्यांनी ही भूमिका बजावण्यास सहमती दर्शवली पाहीजे.

6 / 7

रिपोर्टनुसार टीम इंडियाने श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूच्या अलूरमध्ये प्रशिक्षण शिबिरात सराव करताना कोहलीने नेहमीच्या क्रमांकावर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा सराव केला.

7 / 7

आशिया कप स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर यालाच संधी दिली जाईल. तसेच हा क्रम बदलण्याच्या भानगडीत व्यवस्थापन पडणार नाही. आशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबरला होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us