
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने मंगळवारी 28 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात धमाका केला. वरुणने 4 ओव्हरमध्ये 24 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. वरुणची ही या मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Photo Credit : Bcci)

वरुणने या मालिकेतील 3 सामन्यात 8.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुण या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Photo Credit : Bcci)

वरुणची टीम इंडियासाठी टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची दुसरी वेळ ठरली आहे. वरुणने टी 20I कारकीर्दीत 14.76 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणची 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियासाठी वरुण व्यतिरिक्त याआधी कुलदीप यादव याने 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने 40 टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 'पंजा' उघडला आहे. (Photo Credit : Bcci)

तसेच भुवनेश्वर कुमारनेही कुलदीप आणि वरुणप्रमाणे कामगिरी केली आहे. भुवनेश्वरने टी 20I कारकीर्दीतील 87 सामन्यांमध्ये 2 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र भुवी आणि कुलदीपच्या तुलनेत वरुणने अवघ्या 16 व्या सामन्यातच 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणला त्याच्या या कामिगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारने गौरवण्यात आलं. (Photo Credit : Bcci)