
मुंबईकर सरफराज खान याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 वर्ष घाम गाळल्यानंतर टीम इंडियात संधी मिळाली. सरफराजने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करत धमाका केला.

सरफराजने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. सरफराजने दुसऱ्या डावात नाबाद 68 धावांची खेळी केली.

तर सरफराजने पहिल्या डावात 62 धावा केल्या. सरफराज यासह पदार्पणात अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय आणि तिसरा मुंबईकर ठरला आहे.

सरफराज खान याच्याआधी टीम इंडियाकडून पदार्पणातील दोन्ही डावात अर्धशतकं लगावण्याची कामगिरी ही मुंबईकर श्रेयस अय्यर याने केली होती. श्रेयसने 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 105 आणि 65 धावा केल्या होत्या.

सुनील गावसकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. गावसकर यांनी तेव्हा दोन्ही डावात 65 आणि 67 धावा केल्या होत्या.

तर भारतासाठी पदार्पणात पहिल्यांदा दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा हा दिलावर हुसैन यांनी केला होता. हुसैन यांनी इंग्लंड विरुद्ध 59 आणि 57 धावा केल्या होत्या.