
टीम इंडियाने चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने बिनबाद 40 धावा केल्या. पण त्यानंतर इंग्लंडने धमाकेदार कमबॅक केलंय.

इंग्लंडने चौथ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने एक एक करुन टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत पाठवलाय. तसेच शोएब बशीर याने 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला पूर्णपणे बॅकफुटवर टाकलं.

चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल याच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. यशस्वीनंतर रोहित आऊट झाला.

रोहितनंतर रजत पाटीदारने घोर निराशा केली. रजत पाटीदार सलग दुसऱ्यांदा आऊट झाला.

त्यानंतर शोएब बशीरने टीम इंडियाला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले. बशीरने रवींद्र जडेजा याच्यानंतर सरफराज खान याला आऊट केलं. त्यामुळे आता सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.