
टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)