संजू सॅमसनला टीम इंडियातून यासाठी काढलं गेलं बाहेर? नेमकं काय चुकलं?
भारताचा इंग्लंड दौरा सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दौऱ्यातून संजू सॅमसनला वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याचं काय चुकलं? वगैरे प्रश्न विचारले जात आहेत. असं असताना एक कारण पुढे आलं आहे.

भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला टीम इंडियातून वगळल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. संजूला पाठिंबा देत अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याची पाठराखण केली आहे. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांची त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. असं असताना संजू सॅमसनला वगळण्याचं कारण काय अशी एक बातमी समोर आली आहे. (PC-GETTY IMAGES)

बीसीसीआयची सूत्र सांगत आहे की, सॅमसनला झिम्बाब्वे टी20 मालिकेतून आराम दिला गेला आहे. पण एका रिपोर्टनुसार, संजू सॅमसन फलंदाजीत वारंवार फेल होत असल्याने त्याला बाहेरचा दाखवला गेला आहे. मागच्या काही सामन्यांपासून धावा करण्यात त्याला अपयश आलं आहे. (PC-GETTY IMAGES)

एका रिपोर्टनुसार, संजू सॅमसन एका सामन्यात खोऱ्याने धावा करतो. पण त्यानंतर अनेक सामन्यात काही खास करत नाही. त्याची हीच खेळी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला खटकली आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे, यााबाबत टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. (PC-GETTY IMAGES)

संजू सॅमसनने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1405 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन शतकं ठोकली आहेत. त्याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत संघाला चॅम्पियन केलं. इतकंच काय तर प्लेयर ऑफ टूर्नामेंटही राहिला. इतकी चांगली कामगिरी करूनही संजूची सरासरी फक्त 27.01 आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की संजू सलग धावा करण्यात अपयशी ठरला आहे. (PC-GETTY IMAGES)

संजू सॅमसनबाबत आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, त्याला एशियन्स गेम्समधून डावललं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे टीम इंडिया संजू सॅमसनचा पर्याय शोधत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. (PC-GETTY IMAGES)