
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड डोक्यात घालण्यात आली आहे.

जमिनीच्या वादातून ग्रामपंचायतीत माहितीचा अधिकार टाकल्याचा राग मनात धरून चार आरोपींनी मिळून ही निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे.

भालचंद्र नानू बिराडे (वय 49) असे मयत व्यक्तीचे नाव असून सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भर रस्त्यात ही हत्या झाल्याने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गणेश भोपी, प्रकाश बंधू भोपी, हरिचंद्र ऊर्फ गोट्या भोपी आणि आदर्श भोपी असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

मुरबाड पोलीस ठाण्यात या चार आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.